Posts

स्वप्न

   कमलिनीबाई न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्या त्याला आता २ महिने होत आले होते. सत्कार समारंभ, निरोप समारंभात हे दोन महिने कसे गेले ते त्यांना कळलंही नव्हतं. आता त्या जरा निवांत झाल्या होत्या. एक दिवस दुपारी काहीतरी चाळा म्हणून त्या डायरी घेऊन बसल्या. जुनं काही वाचलेलं आठवत होतं, त्यावर रसग्रहणात्मक टिप्पण्या, भाष्य असं काहीतरी लिहीत होत्या. ४ वाजता सून घरी आली. “काय, कसा गेला आजचा दिवस?” “गेला रोजच्यासारखाच.” असं म्हणून ती आत गेली. कपडे बदलून, हात-तोंड धुवून बाहेर आली तर कमलिनीबाई चहा गाळत होत्या. “हे काय तुम्ही का केलात? राही नाही आली?” “आली होती, पण तिच्या सासूबाईंना बरं नाही म्हणून तिची शेजारीण आली बोलवायला. जाऊन येते म्हणाली. येईल संध्याकाळपर्यंत.” “काय लिहीत होतात?” “असंच काहीतरी आठवत गेलं, लिहावंसं वाटलं. खास काही नाही.” “आई, त्या दिवशी ते चौधरी म्हणत होते काहीतरी कन्सल्टन्सीचं. तुम्ही का करत नाही? इतका अनुभव, अभ्यास. लोकाना फायदा होईल त्याचा.  शिवाय आता तुम्ही सरकारी नोकर नाही  म्हणजे कुणाला काही सल्ला द्यायला तसं काही बंधन नाही तुमच्यावर.” “हो, करेन विचार. पण ...

लिव्ह इन

 #लिव्ह_इन  पुढ्यातल्या प्लेटमध्ये १००ची नोट ठेवून उमेश पाठ वळवून बाहेर पडला आणि निघून गेला. समीरा थिजल्यासारखी बसून होती. आत्ता जे काही घडलं त्याने ती अक्षरशः अवाक् झाली होती. उमेश असं काही उत्तर देईल हे तिला पूर्ण अनपेक्षित होतं. तिच्यासारख्या स्मार्ट, करिअरस्ट मुलीने लग्नाला प्रपोज केलं तर कुणी तिला नाही म्हणणार‘च’ नाही याबद्दल तिची पक्की खातरी होती. आणि उमेश आत्ता स्वच्छ शब्दांत नकार देऊन गेला. तिला सगळं आठवत राहिलं. त्याच्या कंपनीने १०० कोटींचं कर्ज मागितलं होतं तिच्या बँकेकडे. १०० कोटी ही रक्कम तशी किरकोळच होती बँक आणि कंपनी दोघांसाठी, पण कंपनीचं नाव प्रतिष्ठित असल्यामुळे बँक जरा लक्ष देऊन व्यवहार करत होती. प्राथमिक बोलणी झाल्यावर, जरा वरच्या श्रेणीचे अधिकारी बँकेत आले. त्यात उमेश होता. तिचं लक्ष त्याने वेधून घेतलं. ‘मोस्ट एलीजिबल बॅचलर’ म्हणतात तसाच होता तो. कामानिमित्त बोलणं होत राहिलं आणि तो तिच्या मनात रुतत गेला. हळूहळू, बाजुबाजुने ती त्याची माहिती काढत राहिली. सधन, सुसंस्कृत कुटुंबातला, उच्चशिक्षित. वागण्या-बोलण्यातला सभ्यपणा तर ती बघत होतीच. बोलणी पुढे सरकली आणि मग...

लिव्ह इन

  पुढ्यातल्या प्लेटमध्ये १००ची नोट ठेवून उमेश पाठ वळवून बाहेर पडला आणि निघून गेला. समीरा थिजल्यासारखी बसून होती. आत्ता जे काही घडलं त्याने ती अक्षरशः अवाक् झाली होती. उमेश असं काही उत्तर देईल हे तिला पूर्ण अनपेक्षित होतं. तिच्यासारख्या स्मार्ट, करिअरस्ट मुलीने लग्नाला प्रपोज केलं तर कुणी तिला नाही म्हणणार‘च’ नाही याबद्दल तिची पक्की खातरी होती. आणि उमेश आत्ता स्वच्छ शब्दांत नकार देऊन गेला. तिला सगळं आठवत राहिलं. त्याच्या कंपनीने १०० कोटींचं कर्ज मागितलं होतं तिच्या बँकेकडे. १०० कोटी ही रक्कम तशी किरकोळच होती बँक आणि कंपनी दोघांसाठी, पण कंपनीचं नाव प्रतिष्ठित असल्यामुळे बँक जरा लक्ष देऊन व्यवहार करत होती. प्राथमिक बोलणी झाल्यावर, जरा वरच्या श्रेणीचे अधिकारी बँकेत आले. त्यात उमेश होता. तिचं लक्ष त्याने वेधून घेतलं. ‘मोस्ट एलीजिबल बॅचलर’ म्हणतात तसाच होता तो. कामानिमित्त बोलणं होत राहिलं आणि तो तिच्या मनात रुतत गेला. हळूहळू, बाजुबाजुने ती त्याची माहिती काढत राहिली. सधन, सुसंस्कृत कुटुंबातला, उच्चशिक्षित. वागण्या-बोलण्यातला सभ्यपणा तर ती बघत होतीच. बोलणी पुढे सरकली आणि मग आणखी वरच्या श्...

वर्तुळ

 #वर्तुळ बापू झोपाळ्यावर बसले होते. जिजी समोर दारात बसून दुर्वा निवडत होत्या. आज चतुर्थी. फाटकाशी गाडी थांबली. फाटक उघडून सुधीर गाडी घेऊन आत आला. “अगबाई, असा अचानक कसा आलास? गेल्या महिन्यात रोहन १२वी पास झाला, तेव्हा तर सगळी येऊन गेलात.” असं म्हणत जिजी लगबगीने उठल्या.  सुधीर आत येऊन झोपाळ्याजवळ मुढ्यावर टेकला. जिजींनी पुढे केलेल्या तांब्यातलं पाणी प्यायला. किरकोळ बोलणं होईपर्यंत जिजींनी चहा करून आणला. “थालीपीठ लावते, आज चतुर्थी आहे, जेवायला जरा उशीरच होईल.”  आज जाऊन गरम थालीपीठ, त्यावर लोण्याचा गोळा घेऊन आल्या. खाऊन झाल्यावर  सुधीर मागच्या अंगणात जाऊन आंघोळ करून आला. इकडचं तिकडचं किरकोळ बोलत वेळ काढत राहिला. त्याची चलबिचल जिजी आणि बापू दोघांच्या लक्षात आली, पण तो आपणहून बोलेल म्हणून दोघं गप्प राहिली.  जेवणं उरकल्यावर बापूंनी थेट विचारलं. थोडा घुटमळला. मग बोलायला लागला. बांध फुटून पाणी वाहावं तसा. रोहनने परस्पर अमेरिकेत कुठल्याशा विद्यापीठात प्रवेश परीक्षा दिली होती आणि १२वीचे मार्क कळवल्यावर त्याला प्रवेश मिळाल्याचं पत्र आलं होतं. तो काही वेगळा विचार करायला तयार...

माझं काही अडत नाही

  बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव होऊन २ दिवसांत मामी गेल्या. घटना धक्कादायक खरीच. पण शेजारी, नातेवाईक यांनी आधार देऊन सगळं करवून घेतलं. १५ दिवस राहून मुलं आपापल्या घरी गेली. आणि हरिभाऊ एकटे राहिले. ४५ वर्षांचा सहवास, नाही म्हटलं तरी चुकल्या-चुकल्यासारखं झालंच त्यांना. कामाच्या बायका नियमित येत होत्या. महिनाभरात हरिभाऊंचा दिनक्रम पूर्ववत सुरु झाला. धुण्याचं मशीन लावण्याचं काम वाढलं, पण ते तसं सोपं होतं. भांडी किरकोळ असायची. ती स्वयंपाकाच्या बाई घासायच्या. एका माणसाचं काम कमी झालंय तर त्याऐवजी हे करा असा युक्तीवाद करून हरिभाऊंनी त्याची सोय करून टाकली. आत्तापुरतं तरी मिटलं म्हणून ते निवांत झाले. त्याच महिनाभरात केर-लादीच्या बाईंनी २-३ दांड्या मारल्या. हरिभाऊ वैतागले. त्यांना हटकलं तर त्यांनी आवाज वाढवला. “दुसरी बाई बगा तुमी, वयनी कवा काय बोलल्या नाय मला.” गप्प बसले. पुढच्या महिन्यात वीज कापली गेली. त्यांनी घाबरून मुलांना फोन केला. मोठा आला २ दिवसांनी. तोपर्यंत मेणबत्त्या, मोबाईल टॉर्च यावर भागवलं. मुलाने आईचे ड्रॉवर्स धुंडाळले. वीज बिला...

शॉक ट्रीटमेंट

 #शॉक_ट्रीटमेंट  अपघाताची बातमी कळताच मामींचा मोठा मुलगा मिळालेल्या पहिल्या फ्लाईटने अमेरिकेत पोचला. त्याचा धाकटा भाऊ आणि भावजय गाडीच्या भीषण अपघातात जागीच गेले होते. १४ वर्षांची मुलगी सारा घरी होती, ती वाचली. पोलीस आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात दीड-दोन महिने गेले.  मित्रमंडळींनी खूप मदत केली. अपघातात आईवडील गमावलेली सारा नाईलाजाने काकाबरोबर भारतात आली. आजी आणि काका-काकू तिला मुळीच आवडत नसत. जुनी, बुरसटलेल्या मतांची टिपिकल भारतीय मनोवृत्ती असं वाटे तिला. नाही म्हणायला तिचा चुलत भाऊ भास्कर जरा बरा वाटायचा. हुशार होता, व्हरनॅक भाषेत शिकूनही उत्तम इंग्लिश बोलायचा. ॲक्सेन्ट टिपिकल होता, पण शब्दभांडार उत्तम होतं. दिसायलाही बरा होता, अगदी भारतीय फिल्मी हिरोसारखा. आत्ता परिस्थितीने तिच्यासमोर काही पर्यायच ठेवला नव्हता, यावंच लागलं तिला. भारतात येऊन पुन्हा सरकारी सोपस्कार.  तिच्या वडिलांची संपत्ती विकून आणि विम्याचे आलेले पैसे या सगळ्याची तिच्या नावाने योग्य ती गुंतवणूक करण्यात ५-६ महिने गेले. दरम्यान इथल्या उत्तम शाळेत तिचं नाव घातलं,  तिच्यासाठी आजीच्या खोलीत स्...

पोचपावती

 #पोचपावती  मामींचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा छान पार पडला. जवळची मोजकी माणसं, मुलासुनेचं नेटकं आयोजन. सोहळा झाल्यावर मंडळी निवांत गप्पा मारत होती. “काही म्हणा आत्या, उदयभाऊजी फार प्रेम करतात तुमच्यावर. किती काळजी घेतात. साठी, पंचाहत्तरी पण किती छान केली होती.” मामींच्या भावाच्या सुनेने कौतुक केलं उदयचं. “होय गं, उदय आणि नीलिमा दोघं अगदी जपतात, सांभाळतात मला. आता आज बघ ना, उदयने बाहेरची कामं केली आणि नीलिमाने घरची खिंड लढवली. कुठे काही बोट दाखवायला जागा नाही.” मामींची बहीण म्हणाली, “नवऱ्याच्या कामात बायकोचा हात लागतोच हो.” “म्हणून तर संसार तीराला लागतात लोकांचे, ” मामी म्हणाल्या. “सगळ्याच बायकांचा हात असतो गं, दिसतोच तो. पण तो दिसला असं म्हणावं आपण. काय बिघडतं? करणारा काही अपेक्षेने करत नाही, पण कौतुकाचा एखादा  शब्द द्यावा त्यांना. जीव सुखावतो, कष्टांचा विसर पडतो. आपलं म्हणून करतात ना, मग आपल्यांचं कौतुक आपणच करावं की.” नीलिमाचे डोळे भरून आले. आपली सासू किती विचारी आणि समंजस आहे याचा आणखी एक प्रत्यय आला होता तिला. ->>सत्कार नकोत, पण एखादा शब्द पोचपावतीचा अवश्य खर्च कराव...