पैसा

 


सर्व समस्यांचं मूळ पैसा हे नसतं आणि समस्यांवर उत्तरही नेहमी पैसा हे नसतं.


वडिलांच्या मृत्यूनंतर,  भाऊ परदेशात स्थायिक म्हणून, आईला आपल्या घरी नेऊन तिचा सांभाळ करणारी मुलगी.


भावाने स्वेच्छेने वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क सोडला. तसे कायदेशीर कागदपत्र करून बहिणीला दिले. नातेवाईकांनी तोंड भरून कौतुक केलं या कृतीचं. म्हणजे पैशांवर पाणी सोडणं हे खरंच कौतुकास्पद आहे. यात काही शंकाच नाही. 


पण बहीण काही खूष नव्हती फारशी - - -


"देवाच्या कृपेने मला उदंड मिळालंय. पैसा तर आहेच, लाखमोलाची माणसंही मिळालीत. या पैशांचं मला काही अप्रूप नाही.

कित्येक वर्षात कुठे बाहेर नाही गेले. मी १५ दिवस आईजवळ राहतो, तू कुठेतरी फिरून ये म्हणाला असता, तर त्याची मला जास्त अपूर्वाई वाटली असती."


नुसतं 'देणं' महत्त्वाचं नसतं, कुणाला आणि काय याचंही तारतम्य हवं.


#तारतम्य_डॉट_कॉम


राधा मराठे


Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न