दोन धृवावर......
येणार
येणार म्हणून गेली काही वर्ष गाजत असलेला, परिसरातली १०-१२ गावं महामार्गाला जोडणारा
रस्ता करण्याच्या हालचाली प्रत्यक्षात सुरु झाल्या आणि विश्वासराव बापटांचं
घर त्यात गेलं. सरकारने पर्यायी जागा आणि योग्य ती नुकसान भरपाई दिलीच.
पण ती जागा लांब, गावाच्या
दुसऱ्या टोकाला होती. घरामागची वाडी इतक्या लांबून कशी जोपासता
येणार? पुन्हा
घर बांधण्यापासून तयारी करायला हवी होती. अखेर मुलांशी सल्लामसलत
करून जड मनाने त्यांनी निर्णय घेतला. वाडी पुतण्यालाच विकायची,
पर्यायी जागेऐवजी
सगळी रोख रक्कम घ्यायची आणि मुंबई-पुण्यात मुलांच्या सोबतीने
राहायचं. पण आलेले पैसे घर घेण्यात खर्च केले तर उरलेल्या पैशात
शहरातल्या राहणीचा खर्च जड जाणार होता. त्यावर दोघांनी एकेका मुलाकडे
राहायचं असा तोडगा निघाला. फारतर सहा महिन्यांनी आपापल्या जागा बदलायच्या. मोठे
अभिजीत-मधुरा मुंबईत त्यांना एक मुलगी. धाकटा मंदार आणि उर्मिला पुण्यात
त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. विश्वासराव पुण्यात मंदारबरोबर आणि
हेमावहिनी मुंबईत अभिजितबरोबर. आधी मुलांना वाटलं ‘बागबान’
चित्रपटातल्यासारखं ही दोघं आता ‘हम जुदा हो रहें हैं|’ वगैरे काहीतरी
म्हणणार. पण त्या दोघांनी अतिशय शांतपणे मुलांचे निर्णय स्वीकारले.
कोणतीही खळखळ न करता. मधुरा आणि उर्मिलाला हा निर्णय फारसा पटलेला
नव्हता. पण विरोध करायचा तर पर्याय विचारला जाणारच. तो नव्हता त्यांच्याजवळ.
जे होतंय ते स्वीकारणं हा एकच पर्याय सध्या तरी समोर होता.
घरातलं
सामान मुलांना हवं ते मुंबई-पुण्याला पाठवलं, पुतण्याला हवं ते दिलं आणि
बाकीचं गावातच कुणाकुणाला देऊन टाकलं. हेमावहिनींचे दागिने त्या आपल्याबरोबर
घेऊन गेल्या. रोख रकमेचे सरळ दोन भाग करून निम्मी रक्कम मुंबईतल्या घराजवळ
वहिनींच्या नावे वेगळं खातं उघडून तिथे गुंतवली. निम्मी आपण ठेवली. मुलं
चरकली. शेवटची निरवा निरव करावी तसे निर्णय घेत होते विश्वासराव. हे अगदी
अनपेक्षित होतं. पण विश्वासराव आणि हेमावहिनी मात्र शांत होते. मुलांनी
आपसात ठरवलं. आत्ता काही विचारायचं नाही त्यांना. हळूहळू कळेल सगळं
आपल्याला. वाट बघू या.
मधुरा
आणि उर्मिलाला वेगळेच ताण आले होते. लग्न झाल्यापासून आजपर्यंत
८-१० वर्षं स्वतंत्र संसार करायची सवय झाली होती आणि आता अचानक
सासूबाई आणि सासरे आपल्याबरोबर राहणार म्हटल्यावर घरात, रोजच्या दिनक्रमात आणि एकूणच आयुष्यात
मोठे बदल होणार होते. ते स्वीकारणं अपरिहार्य तर होतंच, पण ते जमेपर्यंत
काही मतभेद होऊन वातावरण बिघडू नये अशी त्या मनोमन प्रार्थना करत
होत्या. याशिवाय दोघींना आपापले स्वतंत्र ताण होतेच. सासूबाई
शिस्तीच्या, टापटीप,
सुगरण आहेत. त्या आता
घरात लुडबूड करून वैताग आणणार अशी भीती मधुराला वाटत होती. कितीतरी मैत्रिणींनी
केलेली चिडचिड तिने ऐकली होती. तिकडे पुण्यात उर्मिलाला वेगळीच चिंता.
घरात एक माणूस वाढलं, काम
वाढलं आणि सासऱ्यांची घरात काही मदत होईल अशी अपेक्षा पण
ठेवता येणार नव्हती.
सगळे
व्यवहार उरकून गावातल्या शेजाऱ्यांचा आणि इतर मैत्रपरिवाराचा
निरोप घेऊन मंडळी निघाली. एक गाडी पुण्याच्या दिशेने आणि एक मुंबईच्या
दिशेने. नातवंडांना मात्र आपल्या आई-वडिलांच्या ताणाची कल्पना नव्हती,
ती आपल्याच नादात.
आता आजी घरी आहे म्हटल्यावर आपलं-आपलं दार उघडून आईची वाट बघत
घरात एकटीला बसावं लागणार नाही याची ख़ुशी रमेला पुरेशी होती. आणि
तिकडे पुण्यात आता आपण शाळेतून डे केअर मध्ये न जाता घरी यायचं या कल्पनेने
घरी आल्यावर काय-काय मज्जा करायची याचे बेत चालले होते किरण आणि ऋजुताचे.
मंडळी
आपापल्या घरी पोचली, हात
तोंड धुवून येतांना बांधून आणलेलं जेवली आणि आपापल्या अंथरुणावर आडवी झाली.
मुंबईत अभिजित बापट आणि पुण्यात मंदार बापट ‘बाबांचा व्यवहार
त्यांच्या
मनासारखा पार पडला ते बरं एक प्रकारे. आता तेवढी तरी चिंता नाही त्यांना’
अशा विचारात निवांत – आपल्या बायकोच्या मनात चाललेल्या खळबळीबद्दल अगदीच
अनभिज्ञ. आणि त्यांच्या बायका ‘उद्यापासून काय?’ या कल्पनेने अस्वस्थ.
मुंबई -
- -
मधुरा
रोजच्या वेळेवर उठून आली, तर चहा झालेला होता. दूध तापलेलं
होतं. आणि सासूबाई पेपर घेऊन बाल्कनीत बसल्या होत्या. एक डोळा त्यांच्याकडे
ठेवून ती भरभर आपली कामं उरकत होती. सगळं उरकून रोजच्या वेळेला ती निघाली.
मधल्या वेळेत सासूबाई आपलं उरकून टेबलाशी शांत बसल्या होत्या तिची हालचाल
पाहत. “मी निघते. यायला साडेसहा होतील. रमा ५ वाजता येईल घरी. . . . .
.” अशाच लहान सहान गोष्टी सांगत तिने चपला सरकवल्या आणि दार ओढून घेऊन ती
गेली. वाटेत बसमध्ये, ऑफिसमध्ये
डबा खातांना, संध्याकाळी परत
येतांना डोक्यात सासूबाई ठाण मांडून बसल्या होत्या. सोसायटीत शिरली तर समोर
बाकावर सासूबाई बसलेल्या दिसल्या. आणि रमा मैत्रिणींच्यात खेळत होती. लंगडीचा
डाव रंगला होता. तिला बघून धावत आली. “आई, आजी म्हणाली गृहपाठ रात्री करू या.
आत्ता जरा वेळ खेळ. चालेल?” क्षणभर मधुराच्या कपाळावर आठ्या पडल्या.
‘झाली सुरुवात’ . . . पण सासुचं आपल्याकडे लक्ष आहे म्हटल्यावर ‘हं’ इतकंच म्हणून वर
आली. कपडे बदलून ओट्याशी आली तर तवा, परात दिसली. पोळीच्या डब्यात २
छोटी थालीपीठं होती. छोट्या वाटीत लोणी. कपात काळा चहा झाकलेला. निवांतपणे
खाऊन-पिऊन ती बाल्कनीत येऊन बसली. सोसायटीत दिवे लागले तशा वहिनी रमाला
हाताशी धरुन घरी यायला निघाल्या. ती उठून दार अर्ध उघडून स्वयंपाकघरात गेली.
रमा उड्या मारत घरात आली. “रमा, काय सांगितलं होतं? विसरलीस?” आजीच्या हाकेसरशी रमा धावत बाथरूममध्ये
गेली. हातपाय धुवून आली. आईला शाळेतल्या हकिगती सांगत राहिली. आज
खाली खेळतांना झालेली गंमत आणि भांडणं ही जास्तीची माहिती होती
सांगण्यासारखी. १५-२० मिनिटांनी आजीची हाक आली. “चला, गृहपाठ राहिलाय ना.”
आतल्या
खोलीतून आजी-नातीचं शुभं करोति, इतर नित्यपाठाची स्तोत्रं ऐकू येत होती. १५-२०
मिनिटांनी शांतता. तिने हळूच डोकावून पाहिलं. रमा अभ्यास करत होती,
आणि त्या बाजुला
बसून काहीतरी वाचत होत्या. मध्येच ‘हं, नी दीर्घ-दुसरी काढ.
पहिली नाही.’ किंवा ‘अगं,
असं काय... भागाकार
करतेयस ना तू?’ असं
एखादं आजीचं वाक्य, त्यावर रमाचा
“अय्या’ किंवा ‘sorry आजी’
असा स्वर. मध्येच अभिचा फोन. “आज कंपनीचे चेअरमन आलेत मुंबईत.
थोडा उशीर होईल. तुम्ही जेवून घ्या.” स्वयंपाक झाल्यावर तिने पानं
घेतली आणि “रमा, झालं का?
चला जेवायला.” रमा
आणि आजी बाहेर आल्या. “हे काय, अभिला रोज असा उशीर होतो?”
“नाही. रोज येतात साडेसातपर्यंत. आज काही काम निघालंय. उशीर होईल म्हणून फोन आला होता. आपण जेवून घेऊ या.”
“नाही. रोज येतात साडेसातपर्यंत. आज काही काम निघालंय. उशीर होईल म्हणून फोन आला होता. आपण जेवून घेऊ या.”
किरकोळ
गप्पा मारीत जेवणं झाली. “रेडीओ नाहीये का गं? दुपारी अगदी कंटाळवाणं झालं.”
“टीव्ही नाही पाहिला का?”
“पाहिला थोडा वेळ. पण किती वेळ बघणार? तिकडे फार चॅनेल दिसत नव्हते ना. काय चाललंय काही संदर्भ लागेना. कंटाळा आला.” मधुरा क्षणभर गप्प.
“आणू या छोटा तुमच्यापुरता. आम्ही फारसा ऐकतच नाही.”
“टीव्ही नाही पाहिला का?”
“पाहिला थोडा वेळ. पण किती वेळ बघणार? तिकडे फार चॅनेल दिसत नव्हते ना. काय चाललंय काही संदर्भ लागेना. कंटाळा आला.” मधुरा क्षणभर गप्प.
“आणू या छोटा तुमच्यापुरता. आम्ही फारसा ऐकतच नाही.”
त्या
पुस्तक घेऊन बाल्कनीत बसल्या. रमा आणि तिची आई उरलेला गृहपाठ पूर्ण करण्याच्या
मागे. एकीकडे उद्याची भाजी चिरणं. अभि १० वाजता आला. “काय आई, कसा गेला दिवस?
रमाने शाळेतून
आल्यावर त्रास नाही ना दिला?”
“नाही रे. लहान आहे का ती त्रास द्यायला? वेळ काय जातोच. होईल सवय.”
मग रमाने आपण कशा आज खाली खेळायला गेलो, मग आजीबरोबर अभ्यास केला ते अगदी वर्णन करून सांगितलं. अभिचं जेवण झाल्यावर त्या झोपायला गेल्या. बाहेर थोडा वेळ जाग होती. मग अभिने झोपलेल्या रमाला आणून त्यांच्या बाजुला झोपवली. “गुड नाईट आई.” असं म्हणून तो गेला.
“नाही रे. लहान आहे का ती त्रास द्यायला? वेळ काय जातोच. होईल सवय.”
मग रमाने आपण कशा आज खाली खेळायला गेलो, मग आजीबरोबर अभ्यास केला ते अगदी वर्णन करून सांगितलं. अभिचं जेवण झाल्यावर त्या झोपायला गेल्या. बाहेर थोडा वेळ जाग होती. मग अभिने झोपलेल्या रमाला आणून त्यांच्या बाजुला झोपवली. “गुड नाईट आई.” असं म्हणून तो गेला.
पहिला
दिवस तरी निर्विघ्न गेला म्हणून मधुरा निवांत झोपेच्या आधीन झाली.
पुणं -
- -
उर्मिला
सकाळी उठून बाहेर आली तो विश्वासराव सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. बाहेर
जायचे कपडे घातलेले दिसत होते. बहुतेक चहा घेऊन वॉकला जायचा विचार होता. तिने
दिलेला चहा घेऊन ते निघाले, तेवढ्यात मंदारने त्यांना थांबवलं. “बाबा,
हा महिनाभर मुलं
जातील डे केअरमध्ये. तुम्ही जरा सेटल व्हा. दोन दिवसांनी
मी तुम्हाला डे केअरला नेतो. त्या बाईंशी ओळख करून देतो. म्हणजे
तुम्ही कधी आणा-पोचवायला गेलात तरी त्या ओळखतील.”
ते बाहेर पडल्यावर तो उर्मिलाला म्हणाला, “मुलांना आता जरा कडक ट्रेनिंग द्यायला हवं. निदान शी-शू तरी आपली आपण जाऊन केली पाहिजे.”
ते बाहेर पडल्यावर तो उर्मिलाला म्हणाला, “मुलांना आता जरा कडक ट्रेनिंग द्यायला हवं. निदान शी-शू तरी आपली आपण जाऊन केली पाहिजे.”
सगळं
उरकून उर्मिला निघाली तरी ते परत आले नव्हते. तिने टेबलवर त्यांना चिठ्ठी
लिहून ठेवली आणि ती गेली. संध्याकाळी मुलांना घेऊन मंदार घरी आला तो हिंदुस्थानच्या
पॅटीसचा खमंग वास येत
होता. “आलास? चहा
करतो.” असं म्हणून ते घरात गेले. चहा आणि पॅटीस टेबलावर
ठेवलं, मुलांना
दूध आणि रव्याचे लाडू. “लाडू कुठून आणलेत बाबा?”
“आणतोय कुठून? तुझ्या आईने करून दिले होते येतांना. मुलांना आल्यावर जेवेपर्यंत थोडा पोटाला आधार होतो.”
“आणतोय कुठून? तुझ्या आईने करून दिले होते येतांना. मुलांना आल्यावर जेवेपर्यंत थोडा पोटाला आधार होतो.”
चहा
झाल्यावर ..,. “चला रे
मुलांनो, खाली
जाऊ फिरायला. बाबाला बसू दे घरात निवांत.”
“आजोबा, मी सायकल चालवू? तुम्ही धराल मला?” किरणचा अधीर प्रश्न.
“अरे, तुला येते? कमाल आहे. चल, मी धरतो तुला. आणि तू गं ठकुबाई?”
“मी खेळेन माझ्या फ्रेंड्सबरोबर. माझे पाय अडतात. सायकल लहान आहे. मी आता उंच झालेय ना.” ऋजुताचं थोडं नाराज उत्तर.
“हात्तिच्या, एवढंच ना? आपण आणू की तुला उंच सायकल. चला, आत्ता तू खेळ तुझ्या फ्रेंड्सबरोबर.”
“आजोबा, मी सायकल चालवू? तुम्ही धराल मला?” किरणचा अधीर प्रश्न.
“अरे, तुला येते? कमाल आहे. चल, मी धरतो तुला. आणि तू गं ठकुबाई?”
“मी खेळेन माझ्या फ्रेंड्सबरोबर. माझे पाय अडतात. सायकल लहान आहे. मी आता उंच झालेय ना.” ऋजुताचं थोडं नाराज उत्तर.
“हात्तिच्या, एवढंच ना? आपण आणू की तुला उंच सायकल. चला, आत्ता तू खेळ तुझ्या फ्रेंड्सबरोबर.”
तासाभरात
उर्मिलाची स्कूटर कोपऱ्यावर वाजली. मुलं एकदम “आई – आई” करून धावली. पण आजोबांनी
पट्कन हात पकडला.
“असं धावतात का रस्त्यात? दुसऱ्या गाड्या पण येतायत ना? पडलात, लागलं म्हणजे?”
उर्मिलाने स्कूटर पार्किंगमध्ये लावली. “तू जा वर. जरा फ्रेश हो. मी चहा ठेवलाय करून. मी येतो अर्ध्या तासात मुलांना घेऊन.”
ती वर आली. मंदारकडून सगळा वृत्तांत कळला.
“मंदार, असं परस्पर कसं सांगितलं रे त्यांनी सायकल घेऊ म्हणून. आपण दोन महिन्यांनी घेऊ म्हटलं होतं तिला. हे असं ...” मंदारने तिला थांबवलं. “एकदम अशी उसळू नको. ऋजुता थोडी हिरमुसली होती, म्हणून म्हणाले असतील तसं. धीर धर.”
“असं धावतात का रस्त्यात? दुसऱ्या गाड्या पण येतायत ना? पडलात, लागलं म्हणजे?”
उर्मिलाने स्कूटर पार्किंगमध्ये लावली. “तू जा वर. जरा फ्रेश हो. मी चहा ठेवलाय करून. मी येतो अर्ध्या तासात मुलांना घेऊन.”
ती वर आली. मंदारकडून सगळा वृत्तांत कळला.
“मंदार, असं परस्पर कसं सांगितलं रे त्यांनी सायकल घेऊ म्हणून. आपण दोन महिन्यांनी घेऊ म्हटलं होतं तिला. हे असं ...” मंदारने तिला थांबवलं. “एकदम अशी उसळू नको. ऋजुता थोडी हिरमुसली होती, म्हणून म्हणाले असतील तसं. धीर धर.”
मुलांना
घेऊन ते घरी आले. “चला, हातपाय
धुवा. मग आपण शुभं करोति म्हणू.”
“नको ना. मला आता कार्टून बघायचंय आजोबा. प्लीssssज ... बाबाsss सांग ना आजोबांना.”
“मी नाही बाबा. मी भितो माझ्या बाबांना. ते रागावतील मला मी त्यांचं ऐकलं नाही तर.”
मुलं कुरकुरत गेली. हातपाय धुवून टेरेसमध्ये बसून शुभं करोति झालं. मग गोष्टी झाल्या. तोपर्यंत उर्मिलाने जेवायला बोलावलं. किरण मंदारजवळ जाऊन बसला. मंदारने भात कालवून त्याला भरवायला सुरुवात केली. विश्वासरावांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या त्याने पाहिल्या. ते काही बोलले नाहीत, पण त्यांना हे आवडलेलं नाही हे त्याला जाणवलं.
“आता मोठा झालास ना किरण. सायकल चालवतोस किती फास्ट. मग आपल्या हाताने जेवायचं आता.” उर्मिलाने नवलाने मंदारकडे पाहिलं. एरवी तिने हटकलं तरी तो ‘जाऊ दे’ म्हणायचा. आज तोच हे बोलत होता.
ती मनातल्या मनात . . . “अच्छा, बाबांना शिस्त दाखवतोय का. बघू किती दिवस राहते शिस्त ते.”
“नको ना. मला आता कार्टून बघायचंय आजोबा. प्लीssssज ... बाबाsss सांग ना आजोबांना.”
“मी नाही बाबा. मी भितो माझ्या बाबांना. ते रागावतील मला मी त्यांचं ऐकलं नाही तर.”
मुलं कुरकुरत गेली. हातपाय धुवून टेरेसमध्ये बसून शुभं करोति झालं. मग गोष्टी झाल्या. तोपर्यंत उर्मिलाने जेवायला बोलावलं. किरण मंदारजवळ जाऊन बसला. मंदारने भात कालवून त्याला भरवायला सुरुवात केली. विश्वासरावांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या त्याने पाहिल्या. ते काही बोलले नाहीत, पण त्यांना हे आवडलेलं नाही हे त्याला जाणवलं.
“आता मोठा झालास ना किरण. सायकल चालवतोस किती फास्ट. मग आपल्या हाताने जेवायचं आता.” उर्मिलाने नवलाने मंदारकडे पाहिलं. एरवी तिने हटकलं तरी तो ‘जाऊ दे’ म्हणायचा. आज तोच हे बोलत होता.
ती मनातल्या मनात . . . “अच्छा, बाबांना शिस्त दाखवतोय का. बघू किती दिवस राहते शिस्त ते.”
जेवणं
झाल्यावर ऋजुता म्हणाली, “आई, आज मॅथ्सचा नवा टॉपिक शिकवला.”
“बघू. काय आहे ते. कळलंय ना तुला? नाहीतर उद्या ट्युशन टीचरना सांग परत शिकवायला.”
“कळलंय. पण तू बघ ना जरा.”
“आत्ता मी दमले गं राजा. शनिवारी बघते, चालेल?”
ती कुरकुरत गेली.
“बघू. काय आहे ते. कळलंय ना तुला? नाहीतर उद्या ट्युशन टीचरना सांग परत शिकवायला.”
“कळलंय. पण तू बघ ना जरा.”
“आत्ता मी दमले गं राजा. शनिवारी बघते, चालेल?”
ती कुरकुरत गेली.
“मी बघू का काय आहे
ते? शनिवारला
अजून वेळ आहे. उद्या शाळेत त्यावर पुढची गणितं घातली आणि तिला नाही आली तर?”
“पण बाबा, तुम्हाला कशाला त्रास?”
“त्रास कसला अगं? तिच्या बाबाला मीच शिकवली ना गणितं?”
त्यांनी ऋजुताला हाक मारली. मग पुढचा अर्धा तास त्यांनी तिला परत परत शिकवलं. पुस्तकात नसलेली आपल्या मनाची गणितं तिच्याकडून सोडवून घेतली. “कळलंय ना नीट? चला, पळा आता. कपडे बदलून झोपा.”
“पण बाबा, तुम्हाला कशाला त्रास?”
“त्रास कसला अगं? तिच्या बाबाला मीच शिकवली ना गणितं?”
त्यांनी ऋजुताला हाक मारली. मग पुढचा अर्धा तास त्यांनी तिला परत परत शिकवलं. पुस्तकात नसलेली आपल्या मनाची गणितं तिच्याकडून सोडवून घेतली. “कळलंय ना नीट? चला, पळा आता. कपडे बदलून झोपा.”
मुलांना
झोपवून उर्मिला झोपायला आली. “बाबा छान शिकवतात रे. उत्साह टिकला त्यांचा तर बरंच
होईल मुलांसाठी.”
“टिकला तर म्हणजे? असं गृहीत कसं धरतेस टिकणार नाही म्हणून? तुला माहित नाही बाबा किती उत्तम शिक्षक आहेत. आमच्या बागेतल्या गड्यांच्या मुलांना शिकवायचे ओटीवर बसवून.”
“ओके. तू आता सुरु होऊ नको. खरं म्हणजे मंदार, बरोबर आहे त्यांचं. शिकलेल्या पोर्शनवर लगेच रिव्हिजन केली की पक्का होतो अभ्यास.”
“तू मला सांग आता या गोष्टी......”
“सॉरी. झालं?”
“टिकला तर म्हणजे? असं गृहीत कसं धरतेस टिकणार नाही म्हणून? तुला माहित नाही बाबा किती उत्तम शिक्षक आहेत. आमच्या बागेतल्या गड्यांच्या मुलांना शिकवायचे ओटीवर बसवून.”
“ओके. तू आता सुरु होऊ नको. खरं म्हणजे मंदार, बरोबर आहे त्यांचं. शिकलेल्या पोर्शनवर लगेच रिव्हिजन केली की पक्का होतो अभ्यास.”
“तू मला सांग आता या गोष्टी......”
“सॉरी. झालं?”
मुलांच्या अभ्यासाची
जबाबदारी घेतली बाबांनी तरी खूप मदत होईल असा विचार करत उर्मिलाने डोळे मिटले.
मुंबई -
- -
मधुराच्या
कामात लुडबुड होणार नाही अशा बेताने बऱ्याच गोष्टींचा ताबा हेमावहिनींनी
घेतला. तशी तर मधुराच दोन्ही वेळा चुलीशी उभी राहत होती. तिच्या रोजच्या
ठरलेल्या कामात कधी त्यांनी काही ढवळाढवळ केली नाही. पण स्वयंपाकघरात भाजून
सोललेले दाणे, किसलेलं
कोरडं खोबरं, खरवडलेला नारळ, भाजलेला रवा, ऊन दाखवलेले पोहे, चिरलेला गूळ, वेलचीची पूड, धुवून निवडलेल्या भाज्या – सगळं तिला आयतं
तयार मिळत होतं. डबे-बरण्या रिकामे राहिले असं कधी झालं नाही. काय
संपलंय, काय
लगेच आणायचं-काय महिन्याच्या किराणा यादीत चालेल, दूध तापवण्यापासून
लोणी कढवेपर्यंत काहीच तिला बघावं लागत नव्हतं. मुलांचे अभ्यास,
दुपारचं खाणं,
सगळ्यातून ती थोडी मोकळी
झाली होती. दोन महिन्यात २ नाटकं आणि ३ सिनेमे पाहिले त्या दोघांनी मिळून.
मुलं घरी आजीजवळ ठेवून. हेमावहिनी सोसायटीतल्या भिशीत सामील झाल्या होत्या.
घराजवळ लायब्ररीत मेंबर झाल्या होत्या. जवळपासच्या भागात आपल्या आपण
एकट्या फिरु शकत होत्या.
“अभि,
आई किती छान
शिकवतात. रमाचा अभ्यास सुधारलाय म्हणत होत्या टीचर परवा PTA मिटिंगमध्ये. आणि हल्ली किती मोकळी आणि
खुश असते. टीव्हीची तर आठवण होत नाही तिला. त्या पण नाही बघत फारसा.
ती घरी नसतांना काय बघतात तेवढा. गाणी मात्र भरपूर ऐकतात. मराठी-हिंदी. ही
पण हल्ली गाणी गुणगुणत असते. मुख्य तिची वेणी घालण्याच्या व्यापातून
सुटले मी. केस कापू देत नव्हती बया. रोजची रडारड त्या वेणीची.”
“हं. त्या काळची बी.ए.आहे माझी आई. सरकारी नोकरीची परीक्षा पास झाली होती. पण लग्न झालं, बाबा नकोच म्हणाले नोकरी करायला. कॉल आला होता तरी सोडली संधी. आमच्या गावात खरं तर तिच्या हुशारीची कदर झालीच नाही. पण ठीक आहे. आपल्या रमाला तर फायदा होतोय.”
“हं. त्या काळची बी.ए.आहे माझी आई. सरकारी नोकरीची परीक्षा पास झाली होती. पण लग्न झालं, बाबा नकोच म्हणाले नोकरी करायला. कॉल आला होता तरी सोडली संधी. आमच्या गावात खरं तर तिच्या हुशारीची कदर झालीच नाही. पण ठीक आहे. आपल्या रमाला तर फायदा होतोय.”
एक दिवस
त्या म्हणाल्या, “अभि,
तो कॉम्प्युटर
केवढ्याला पडतो रे?”
“का गं?”
“एक घेऊ या रे. रमा आणि मीही शिकेन. त्या प्रधानबाई सांगत होत्या, इन्टरनेटवर किती माहिती मिळते. आणि नको त्या ठिकाणी child lock लावायचं म्हणजे मुलं काही नको ते बघणार नाहीत. रमाला लागेल आता थोडे दिवसांनी. मी पण शिकून घेईन. तिला थोडी मदत होईल, माझा वेळ जाईल.”
“का गं?”
“एक घेऊ या रे. रमा आणि मीही शिकेन. त्या प्रधानबाई सांगत होत्या, इन्टरनेटवर किती माहिती मिळते. आणि नको त्या ठिकाणी child lock लावायचं म्हणजे मुलं काही नको ते बघणार नाहीत. रमाला लागेल आता थोडे दिवसांनी. मी पण शिकून घेईन. तिला थोडी मदत होईल, माझा वेळ जाईल.”
घरात कॉम्प्युटर
आला. आजी-नातीला आणखी एक विरंगुळा.
पुढच्या वर्षभरात मधुरा अधिकाधिक निवांत होत
गेली. ऑफिसमध्ये कामात जास्त लक्ष देत गेली आणि त्याचं फळ तिला मिळालं.
बढती मिळाली, पगारवाढ
झाली आणि घराजवळच्या ब्रांचमध्ये बदली. जायचा-यायचा वेळ आणि दगदग दोन्ही
वाचलं. अतिशय मनापासून ती वहिनींना म्हणाली, “तुमच्यामुळेच झालं हे सगळं. तुम्ही
घरातल्या माझ्या जबाबदाऱ्या कमी केल्यात म्हणून हे करू शकले मी. या
वयात तुम्हाला असं बाबांपासून दूर राहावं लागतंय. पण तुम्ही किती मनापासून
जुळवून घेतलंय इथे.” भरून पावल्या हेमावहिनी.
पुणं -
- -
“मंदार,
बाबा किती मदत करतात
घरात. स्वयंपाकघरात मला नाही मदत होत त्यांची, पण बाहेरची आणि
घरातली इतर सगळी कामं करतात. काही बघायला लागत नाही आपल्याला. ते स्वत: किती
टापटीप आहेत आणि मुलांना पण तशाच सवयी लावल्यात. किती independent झालीत मुलं बाबा
आल्यापासून. आणि रमतात पण त्यांच्याजवळ. किती मोकळेपणा मिळतो
हल्ली आपल्याला. सगळी बिलं वेळच्या वेळी जातात, कुठला बल्ब गेलाय आणि बदलायचा राहिलाय,
घरात कुठे काही बिघडलंय,
मोडलंय असं तर आठवतच
नाही कित्येक महिन्यात. आणि अरे, वॉचमन सांगत होता, सोसायटीत सगळी मुलं हल्ली त्यांना गणितं
विचारतात संध्याकाळी. क्लासच भरतो म्हणे पार्किंगमध्ये.
सिनियर सिटीझन क्लबमध्ये खूप मित्र झालेत त्यांचे. पत्तेक्लब भरतो
जोशांच्या घरी दुपारी. मधुरा सांगत होती परवा फोनवर, आई पण अशाच रमल्यात तिच्याकडे.”
“तूच बघ. उगाच कटकट करत होतीस.”
“अरे कटकट म्हणजे काय? किती जणींची तक्रार ऐकते ना मी. सासू-सासरे खडूस असतात. कटकट करतात म्हणून.”
“उर्मिला, तुला किती वेळा सांगितलंय, दुसऱ्याचं ऐकून असं आपल्या माणसांबद्दल शंका घेत जाऊ नको. मागे त्या सरिताच्या नवऱ्याचं बाहेर काही अफेअर होतं, तर माझी रोज उलट तपासणी करत राहायचीस. ते समोरचे खांडेकर कुठेतरी गुंतवणुकीच्या व्यवहारात फसले तर माझ्यामागे सारखा धोशा लावला होतास बाबांना विचार त्यांनी काय केलंय म्हणून. बर नाही हे. एकाच मापाने सगळी माणसं मोजू नयेत अशी.”
“आय नो, आय नो. आता लेक्चर सुरु करू नको.”
“तूच बघ. उगाच कटकट करत होतीस.”
“अरे कटकट म्हणजे काय? किती जणींची तक्रार ऐकते ना मी. सासू-सासरे खडूस असतात. कटकट करतात म्हणून.”
“उर्मिला, तुला किती वेळा सांगितलंय, दुसऱ्याचं ऐकून असं आपल्या माणसांबद्दल शंका घेत जाऊ नको. मागे त्या सरिताच्या नवऱ्याचं बाहेर काही अफेअर होतं, तर माझी रोज उलट तपासणी करत राहायचीस. ते समोरचे खांडेकर कुठेतरी गुंतवणुकीच्या व्यवहारात फसले तर माझ्यामागे सारखा धोशा लावला होतास बाबांना विचार त्यांनी काय केलंय म्हणून. बर नाही हे. एकाच मापाने सगळी माणसं मोजू नयेत अशी.”
“आय नो, आय नो. आता लेक्चर सुरु करू नको.”
घरच्या
आणि मुलांच्या पुष्कळशा जबाबदाऱ्या बाबांनी घेतल्यावर मंदारला निवांतपणा
मिळायला लागला. बरेच दिवस त्याच्या मनात स्वत:ची कन्सल्टन्सी
सुरु
करायची होती. पण उर्मिला करू देत नव्हती. तिला एकटीला घरच्या आणि बाहेरच्या
जबाबदाऱ्या पेलणार नाही म्हणायची. पण आता त्याने तो बेत अंमलात आणायचं
ठरवलं.
“बाबा, एक विचारु का?”
“विचार ना.”
“तुम्ही घरात सगळं बघता. संध्याकाळी घरी आल्यावर मला तसं काही काम नसतं. मी कन्सल्टन्सी सुरु करावी म्हणतो. सध्या घरातून काम करीन. गरज पडली तर मग बघू स्वतंत्र जागेचं.”
“हो, कर ना. घरची काळजी नको करू. मी आहे उर्मिलाच्या मदतीला.”
“बाबा, एक विचारु का?”
“विचार ना.”
“तुम्ही घरात सगळं बघता. संध्याकाळी घरी आल्यावर मला तसं काही काम नसतं. मी कन्सल्टन्सी सुरु करावी म्हणतो. सध्या घरातून काम करीन. गरज पडली तर मग बघू स्वतंत्र जागेचं.”
“हो, कर ना. घरची काळजी नको करू. मी आहे उर्मिलाच्या मदतीला.”
आणि सहा महिन्यात
त्याच्या कामाने जोर धरला. असंच काम चालू राहिलं तर एक दोन वर्षात नोकरी
सोडून पूर्ण वेळ हेच करता येईल इतका आत्मविश्वास वाटायला लागला त्याला.
“खरंच
बाबा, तुमच्यामुळे
होतंय हे. तुम्ही मला घरच्या जबाबदाऱ्या न घेण्याची मोकळीक दिलीत,
म्हणून मी ह्या
कामाकडे लक्ष देऊ शकतोय. नाहीतर नोकरी एके नोकरी करत राहिलो
असतो. जे होतं ते बऱ्यासाठी. आपलं घर गेलं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं.
वाटलं दोन दिवस कुठे जावंसं वाटलं तर जागा नाही उरली. पण वाईटातून
चांगलं निघतं म्हणते आई नेहमी, ते असं. आई मुंबईला आणि तुम्ही इथे असं
राहताय, पण किती
छान रमवलंय तुम्ही स्वत:ला.” विश्वासराव खुश झाले.
विश्वासराव
आणि हेमावहिनी आपापल्या जागी रमले, विरघळले. २-३ महिन्यांनी एकदा मुंबई किंवा
पुण्यात ८-१० दिवस दोघं एकत्र राहत, फिरत, बोलत. पुन्हा आपापल्या जागी जात.
दिवाळी-दसरा-गणपती एका घरी ठरवून सगळी एकत्र राहत. अभि-मधुरा रमाला
घेऊन टूरवर गेले तर विश्वासराव मुंबईला येत आणि मंदार-उर्मिला
मुलांना घेऊन फिरायला गेले की हेमावहिनी पुण्याला जात. ‘दोन धृवावर दोघे आपण’
असे राहत होते, पण तरी
शांत-निवांत होते.
विश्वासरावांचा
अमेरिकेत राहणारा शाळकरी मित्र सुट्टीवर पुण्यात आला होता. त्याने
विश्वासरावांना हटकलं, “बापटा
लेका, या वयात
दुसरी इनिंग सुरु करतात माणसं, तुम्ही दोघं असे अदृश्य, छुपा घटस्फोट घेऊन
का राहताय?”
“मुलांची गरज रे. आमचं घर रस्त्यात गेलं, मुलांच्या सोबतीने राहावं लागणार हे तर अटळ. मग स्वीकाराव्या लागतात अशा तडजोडी.”
“तू मला हे असलं शिकवू नको हां तडजोडी वगैरे. मी ओळखतो तुला. न पटलेली गोष्ट अशी सहजासहजी स्वीकारणारा नाहीस तू. आणि या वयात असं एकटं राहणं सोपं नाही एवढं कळतंय मला. खरं सांग काय ते.”
“मुलांची गरज रे. आमचं घर रस्त्यात गेलं, मुलांच्या सोबतीने राहावं लागणार हे तर अटळ. मग स्वीकाराव्या लागतात अशा तडजोडी.”
“तू मला हे असलं शिकवू नको हां तडजोडी वगैरे. मी ओळखतो तुला. न पटलेली गोष्ट अशी सहजासहजी स्वीकारणारा नाहीस तू. आणि या वयात असं एकटं राहणं सोपं नाही एवढं कळतंय मला. खरं सांग काय ते.”
विश्वासराव
क्षणभर गप्प बसले. मग काहीतरी ठरवल्यासारखं म्हणाले, “खरं आहे तुझं. ते
इष्टापत्ती म्हणतात तसं झालंय. एकमेकांच्या गुणांची आम्हाला
कदर आहेच, पण दोष
मात्र अलीकडे सोसेनासे झाले होते. वाद टाळण्यासाठी
आम्ही दोघंही सतत आपापल्या परीने पडतं घेत होतो, त्याचा कंटाळा आला
होता. लहान सहान कुरबुरी तर सगळ्याच घरात असतात. त्यांचं एवढं काही
नाही. संस्कारी घरातले होतो म्हणून निभवलं. पण अलीकडे सारखी भीती वाटायची.
तेवढ्यात हे रस्त्याचं निघालं. लांब राहून वाडी कशी बघणार? मग नाईलाजाने सगळं
गुंडाळून आलो मुलांकडे. सुरुवातीला जड गेलंच. सहवासाची, सोबतीची सवय असते.
नाराजी असली तरी माणूस आपलं हक्काचं आहे ही भावना असते रे मनात.
पण नंतर लक्षात आलं की हे काहीसं सुखकर होतंय. आपापल्या ठिकाणी मदतीचा हात
पुढे केल्यामुळे घरात कदर होते, मताला किंमत आहे, नात्याचा मान मिळतो. जिथे वादाचा मुद्दा
दिसतो, तिथे आम्ही
तोंडाला कुलूप घालतो. अंग काढून घेतो. इतकी वर्ष स्वत:च्या संसारात सुध्दा
हेच केलं की. आता तर संसार मुलांचे आहेत. आपल्या संसारात वाटतो तसा हक्क
नाही वाटत एखाद्या गोष्टीचा. जबाबदारी आपली नसते. मोजकी कामं केली तरी मुलं-सुना
खुश असतात. एकत्र राहिलो तरी संसाराच्या जबाबदाऱ्या चुकत नाहीत. आता
मुलांना मदत होतेय, आम्हाला
थोडं मोकळं वाटतंय. आम्ही नाही अंगाला काही लावून घेत. २-३ महिन्यांनी आम्ही
भेटतो तेव्हा मोकळ्या गप्पा होतात. जुन्या आठवणी निघतात. अरे, एकदोन वेळा तर आम्ही
चक्क एकमेकांची माफीही मागितली ‘अमुक वेळेला माझं चुकलं’ असं
कबूल करून. पुढे जेव्हा असं वाटेल की आता नाही राहायचं असं दूर, तर तसं सांगू
मुलांना. काहीतरी मार्ग काढू. नातवंडंही तोपर्यंत मोठी होतील, राहतील एकटी. छोटं
घर घेऊ भाड्याने. दोन खोल्या सुध्दा पुरतील आम्हाला. पण सध्या
तरी आम्ही असेच निवांत आहोत.”
“कमाल आहे तुझी विश्वास. किती खुलेपणाने कबूल करतोयस.”
“नाकबूल करण्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीच आहे ती. माणसं आपापल्या भूमिकेत बरोबर आणि चांगलीच असतात, पण एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी अनुरूप नसतो त्यांचा स्वभाव. ते हल्लीची मुलं म्हणतात ना compatibility तसं. कोणत्या झाडाला कोणतं खत मानवतं ते ठरलेलं असतं ना तसंच माणसांचं पण असतं. तू अमेरिकेत जन्म घालवलास. तुला तर ही compatibilityची कन्सेप्ट माझ्यापेक्षा जास्त चांगली कळली पाहिजे.”
“लकी आहात रे. तुम्हाला संधी मिळाली. ज्यांना नाही मिळत ते काय करत असतील?”
“खरं आहे. आम्हाला संधी मिळाली. इतक्या वर्षांच्या संसारानंतर आता स्वतंत्र जगायची संधी. दोन धृवावर राहतोय, पण तरी नात्याच्या, सहवासाच्या धाग्याने बांधलेले आहोत आम्ही. पूर्ण मोकळे नाही. आणि तसं मोकळं व्हायची इच्छाही नाही. जेव्हा गरज वाटेल तेव्हा अंतर संपवता येईल याची काळजी घेतलीय आम्ही.”
“काहीही करा, आनंदात रहा. खूप मनापासून शुभेच्छा विश्वास तुला. वहिनींना नमस्कार सांग माझा.”
“कमाल आहे तुझी विश्वास. किती खुलेपणाने कबूल करतोयस.”
“नाकबूल करण्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीच आहे ती. माणसं आपापल्या भूमिकेत बरोबर आणि चांगलीच असतात, पण एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी अनुरूप नसतो त्यांचा स्वभाव. ते हल्लीची मुलं म्हणतात ना compatibility तसं. कोणत्या झाडाला कोणतं खत मानवतं ते ठरलेलं असतं ना तसंच माणसांचं पण असतं. तू अमेरिकेत जन्म घालवलास. तुला तर ही compatibilityची कन्सेप्ट माझ्यापेक्षा जास्त चांगली कळली पाहिजे.”
“लकी आहात रे. तुम्हाला संधी मिळाली. ज्यांना नाही मिळत ते काय करत असतील?”
“खरं आहे. आम्हाला संधी मिळाली. इतक्या वर्षांच्या संसारानंतर आता स्वतंत्र जगायची संधी. दोन धृवावर राहतोय, पण तरी नात्याच्या, सहवासाच्या धाग्याने बांधलेले आहोत आम्ही. पूर्ण मोकळे नाही. आणि तसं मोकळं व्हायची इच्छाही नाही. जेव्हा गरज वाटेल तेव्हा अंतर संपवता येईल याची काळजी घेतलीय आम्ही.”
“काहीही करा, आनंदात रहा. खूप मनापासून शुभेच्छा विश्वास तुला. वहिनींना नमस्कार सांग माझा.”
मनात
साठलेलं बोलून मोकळं वाटलं विश्वासरावांना. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी
हेमावहिनींना whatsapp कॉल
लावला. दोघंही आता पुरेशी ‘स्मार्ट’ झाली होती. पैसे खर्च न करताही हवं तेव्हा
संपर्कात राहण्याची युक्ती सापडली होती त्यांना.
उपसंहार.......
समुपदेशन
शिकतांना एक केस ऐकली होती. नवरा-बायको दोघं कारणपरत्वे दोन
मुलांकडे राहायला लागले. नवऱ्याने आधी विरोध केला. त्याला जमेना. पण
बायको शांत होती. तिने मुला-सुनेशी छान जुळवून घेतलं. त्याचं नवऱ्याला
डिप्रेशन आलं. बायको आपल्यावाचून आनंदात आहे हे त्याला स्वीकारता येईना.
मनात
घोळत राहिली ही केस. जे आपल्याला ठासून सांगितलं जातं ते
प्रत्यक्षात तसंच असेल असं आपण सहज गृहीत धरतो. ‘बागबान’ सिनेमा
आल्यानंतर नवरा बायको उतरत्या वयात वेगळे राहणं हे अन्यायकारक आहे असं
कुठेतरी कुणीतरी म्हटलं आणि आपण ते प्रत्येक घरी तसंच असतं असं गृहीत धरुन
चाललो. संसार करतांना सतत पडतं घेऊन, तडजोडी करून माणसं कंटाळत असतील, त्यातून थोडी सुटका
हवीशी वाटत असेल, अति परिचयात् अवज्ञा असं होत असेल याचा विचारच
नाही करत आपण. मग नवरा बायको उतार वयात एकमेकांपासून लांब
राहूनही खुश राहू शकतात ही मध्यवर्ती कल्पना घेऊन त्याभोवती कथा केली. त्यांचं
वैयक्तिक/कौटुंबिक आयुष्य कसं असेल त्याची कल्पना करून, भोवती घडणाऱ्या
बऱ्या-वाईट घटनांचा आधार घेऊन कथा सजवली. समाजात काय चाललं आहे ते आपण नेहमी
बघतो, ऐकतो,
वाचतो. काय आहे त्याची
नकारात्मक चर्चा करण्यापेक्षा काय असावं त्याचं सकारात्मक चित्रण करावं
असं वाटलं आणि 'दोन
धृवावर' ही सत्य
घटनेचं बीज असलेली काल्पनिक कथा आकाराला आली.
दोन
चांगली माणसं एकमेकांना अनुरूप असतील याची खात्री अगदी प्रेमविवाहात
सुध्दा नसते. प्रत्यक्ष एकत्र आयुष्य सुरु झालं की दोषांचे काटे
टोचायला लागतात. काही जणांना त्या काट्यांची टोकं बोथट करायला जमतं,
काही जखमेला
मलमपट्टी करून आयुष्य सुसह्य करतात. मग लांब राहायची वेळ आली तर ती संधी
वाटते. आपल्या संसारात माणसं जितकी हट्टी-आग्रही असतात, तितकी मुलाच्या संसारात गुंतत नाहीत.
(हेही एक ढोबळ गृहितक.)
कथेत गुंतून
जाऊन अनेकांनी सूचना केल्या. त्यांना एकत्र आणा, त्यांना एकमेकांसाठी वेळ
देता यायला हवा, मुलांशी
दोघांचं चांगलं जमतंय त्यात आता काही वेगळे फाटे फोडू नका अशा खूप सूचना.
आत्मीयतेच्या. काल्पनिक विश्वासराव आणि हेमावहिनी यांच्या सुखी
संसारासाठी दिलेल्या एक प्रकारच्या शुभेच्छाच त्या.
वाचणाऱ्याच्या
मनाला स्पर्श करील असं काहीतरी आपल्या हातून लिहिलं गेलं ही जाणीव खूप आनंद देणारी
असते.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप सुरेख आणि वाचनीय कथा ,सत्य घटनेचं बीज आणि त्याची काल्पनिक कथा !! वा छान !! आपले असे ललित लेख असतील तर नक्की पाठवत चला.. प्रदीप पाटील, लोकमत, पुणे 7387543478
ReplyDeleteखूपच सुंदर ललित कथा. मनाला खूप भावली.कथेतून वास्तव दिसलं
ReplyDeleteखूप छान लिहिलेली आहे कथा.... तुमची कल्पनाशक्ती अशीच वाढो... या साठी शुभेच्छा 👍👍
ReplyDeleteNice one ❤