Posts

Showing posts from March, 2018

ललित साहित्य - ललित लेखन

ललित लेखन - ललित लेखन ललित लेखन म्हणजे काय ते सांगा असं एका फेबु मित्राने सुचवलं म्हणून हा लेख - लेखनाच्या अनेक प्रकारात ललित लेखन हा लोकप्रिय प्रकार आहे. मराठीतल्या प्रणय कादंबरीचे प्रणेते ना , सी. फडके या साहित्य प्रकाराचे जन्मदाते असं म्हटलं तर चूक ठरु नये. याआधी लिहिलं गेलंच नाही असं नसेल पण ललित लघुलेख हा प्रकार फडक्यांनी लोकप्रिय केला. कोणत्याही विषयावरची तांत्रिक माहिती न देता , किंवा ती माहिती देतांना सुध्दा थोडं भावनिक अंगाने लिहिलं की ते ललित होतं. उदा. स्त्रीच्या बाळंतपणाबद्दल लिहितांना गर्भधारणा , गर्भाची वाढ वगैरे तपशील दिले तर तो प्रसुतीविषयक माहिती देणारा लेख होतो. पण तोच ' बाळाची चाहूल ', ' डोहाळे ' अशा शीर्षकांनी लिहिला आणि त्यात बाईची बदलती मानसिकता , तिचे बदलते रुप , गर्भाच्या वाढीबरोबर बदलणारं तिचं रोजचं आयुष्य यांचं वर्णन केलं की तो ललित लेख. मी काश्मीरला गेले तर कशी गेले , बुकिंग कसं केलं , कोणत्या कंपनीबरोबर गेले , कुठे राहिले , कशी फिरले , खर्च किती आला वगैरे माहिती हे प्रवास मार्गदर्शन होईल. पण काश्मीरचं स...

ललित साहित्य - कथा

ललित लेखन – कथा ललित लेखनाचा एक लोकप्रिय प्रकार म्हणजे कथा. आता मुळात ललित लेखन हे वास्तवावर आधारलेला कल्पनेचा डोलारा अशा स्वरूपाचं असतं, त्यामुळे कथेत कल्पनेची भरारी असणार हे उघड आहे. पण प्रत्येक कथा प्रकारात कल्पनेचा अविष्कार वेगवेगळ्या पध्दतीने केलेला आपण पाहतो. कथेचे तर अनंत प्रकार आहेत – प्रेम कथा, कुटुंब कथा, विद्रोही कथा, पुराण कथा, ऐतिहासिक कथा, नव कथा, भय कथा, रहस्य कथा हे आपल्या ओळखीचे काही प्रकार. कथेत एक मुख्य सूत्र आणि उद्देश असावा लागतो. नायक/नायिका, त्यांच्या आजूबाजूची माणसं ही गरजेप्रमाणे असतात. म्हणजे एखादी कथा नायिकेची असते, त्यात इतरांना कमी अधिक महत्त्व असतं. एखाद्या कथेत नायक असतो. नायक-नायिकेचं वय, शिक्षण, आर्थिक/सामाजिक परिस्थिती, धर्म, जात, राष्ट्रीयत्व लेखकाच्या मर्जीनुसार ठरतं. पण तहात निव्वळ निवेदन नसतं. त्या निवेदनाला थोडी भावनिक डूब असते. अगदी विद्रोही कथा असली तरी विद्रोहातली जळजळीत धार वाचणाऱ्याला जाणवली पाहिजे. मी एखाद्या भाजीवालीची कथा लिहिणार असेन. तर ती घाऊक बाजारात जाते, भाजी विकत घेते, त्यांचे वाटे करते, ठराविक ठिकाणी बसून विकते ही ...

दोन धृवावर......

येणार येणार म्हणून गेली काही वर्ष गाजत असलेला , परिसरातली १०-१२ गावं महामार्गाला जोडणारा रस्ता करण्याच्या हालचाली प्रत्यक्षात सुरु झाल्या आणि विश्वासराव बापटांचं घर त्यात गेलं. सरकारने पर्यायी जागा आणि योग्य ती नुकसान भरपाई दिलीच. पण ती जागा लांब , गावाच्या दुसऱ्या टोकाला होती. घरामागची वाडी इतक्या लांबून कशी जोपासता येणार ? पुन्हा घर बांधण्यापासून तयारी करायला हवी होती. अखेर मुलांशी सल्लामसलत करून जड मनाने त्यांनी निर्णय घेतला. वाडी पुतण्यालाच विकायची , पर्यायी जागेऐवजी सगळी रोख रक्कम घ्यायची आणि मुंबई-पुण्यात मुलांच्या सोबतीने राहायचं. पण आलेले पैसे घर घेण्यात खर्च केले तर उरलेल्या पैशात शहरातल्या राहणीचा खर्च जड जाणार होता. त्यावर दोघांनी एकेका मुलाकडे राहायचं असा तोडगा निघाला. फारतर सहा महिन्यांनी आपापल्या जागा बदलायच्या. मोठे अभिजीत-मधुरा मुंबईत त्यांना एक मुलगी. धाकटा मंदार आणि उर्मिला पुण्यात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. विश्वासराव पुण्यात मंदारबरोबर आणि हेमावहिनी मुंबईत अभिजितबरोबर. आधी मुलांना वाटलं ‘बागबान’ चित्रपटातल्यासारखं ही दोघं आता ‘हम जुदा हो रहें ...